पाटणा: बिहारच्या नवादा येथे मुलांच्या भांडणात मोठ्यांनी हस्तक्षेप केला आणि त्याचे परिणाम वाईट झाले. दोन्ही कुटुंबादरम्यान चांगलाच वाद वाढला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील ११ जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केले. ही घटना कादिरगंज येथे घडली. येथे काही लहान मुलांमध्ये बाचाबाची झाली. या लढाईत मोठ्यांनी भाग घेतला. त्यांच्यातही वाद सुरू झाला. लाठ्या-काठ्या, विटा, दगड यांनी मारामारी सुरू झाली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील महिलांसह ११ जण जखमी झाले.
जखमींमध्ये एका कुटुंबातील ७ जण तर दुसऱ्या कुटुंबातील ४ जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पौरा गावात सरस्वतीच्या मूर्तीच्या विसर्जनादरम्यान या दोन्ही कुटुंबातील मुलांमध्ये बाचाबाची झाली. यावरून वाद झाला होता. तेथील लोकांनी हा वाद मिटवला होता. याबाबत पंचायतही भरवण्यात आली आणि प्रकरण संपवण्यात आले. मात्र त्यानंतर एका कुटुंबातील लोकांनी दुसऱ्या कुटुंबावर हल्ला केला.
जखमींमध्ये एका कुटुंबातील पौरा गावाचे निवासी सोमर चौधरींचे पुत्र गौरे चौधरी, दिनेश चौधरी, छोटू कुमार, शौरभ कुमार, बाले चौधरींचा पुत्र सुरेंद्र कुमार, सोनरवा देवी, दिव्यांशी कुमारी जखमी झाले आहेत. यातील गोरे चौधरी यांची स्थिती गंभीर आहे. तर दुसऱ्या कुटुंबातील पौरा गावाचे निवासी मेवा लाल यांचे पुत्र संजय राम, दीपक सिंह यांचे पुत्र कुंदन कुमार, गौतम सिंह आणि पंकज कुमार हे जखमी झालेत.