Mahakumbh Mela Fire : महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव! अनेक तंबू जळून खाक

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. महाकुंभाच्या सेक्टर २२ आणि सेक्टर १९ मधील अनेक तंबूंना आग लागली होती. या घटनेला आठवडाही उलटला नसताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. (MahaKumbh Mela Fire)



महाकुंभ मेळ्यात सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास छावणीत दोन ठिकाणी ही घटना घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे समोर आले नसले तरीही आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र महाकुंभमेळ्यात सातत्याने आगीच्या घटना घडत असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (MahaKumbh Mela Fire)




Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या