Mahakumbh Mela Fire : महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव! अनेक तंबू जळून खाक

  118

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. महाकुंभाच्या सेक्टर २२ आणि सेक्टर १९ मधील अनेक तंबूंना आग लागली होती. या घटनेला आठवडाही उलटला नसताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. (MahaKumbh Mela Fire)



महाकुंभ मेळ्यात सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास छावणीत दोन ठिकाणी ही घटना घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे समोर आले नसले तरीही आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र महाकुंभमेळ्यात सातत्याने आगीच्या घटना घडत असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (MahaKumbh Mela Fire)




Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे