Mahakumbh Mela Fire : महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव! अनेक तंबू जळून खाक

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. महाकुंभाच्या सेक्टर २२ आणि सेक्टर १९ मधील अनेक तंबूंना आग लागली होती. या घटनेला आठवडाही उलटला नसताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. (MahaKumbh Mela Fire)



महाकुंभ मेळ्यात सेक्टर १८ मधील शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास छावणीत दोन ठिकाणी ही घटना घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याचे समोर आले नसले तरीही आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र महाकुंभमेळ्यात सातत्याने आगीच्या घटना घडत असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (MahaKumbh Mela Fire)




Comments
Add Comment

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक