महापालिकेच्या कामकाजात आता एआयचा वापर

विकास नियोजन खात्यात याची घेतली जाणार मदत


मुंबई(विशेष प्रतिनिधी) - आजच्या आधुनिक काळात महापालिकेच्या कामकाजातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या कारभारात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील पायाभूत सुविधाबांबतचे निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थांत आटीफिशर इंटेलिजन्स - एआय चा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्या विकास नियोजन खात्यामार्फत या एआयचा वापर केला कामकाजात केला जाणार आहे.


मुंबई महापालिकेने भविष्यातील विकासाचा कल ओळखून संभाव्य शहरी मागणीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांबाबतची निर्णय प्रक्रिया सुधारण्याकरता विकास नियोजन खात्यामार्फत कृत्रिम बुध्दीमत्तेचा अर्थात एआय वापर करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या सन २०२५-२६ आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.


महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून मुंबईतील विकास नियोजनाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये एकूण किती इमारतींना बांधकामाच्या परवानगी दिल्या आहेत, त्यातील ७० मीटर पेक्षा अधिक बांधकामाच्या इमारती किती आहे, उद्यान, मैदान, मनोरंजन मैदान आरक्षित किती भूखंड आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे अशाप्रकारच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांची माहितीकरता ए आय वापर कामकाज पध्दतीत केला जाणार आहे. या एआयच्या वापर केल्यास एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय