Pariksha Pe Charcha : यंदा ‘परिक्षा पे चर्चा’ सहभागासाठी ३ कोटी ५६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पंतप्रधान मोदींसह दीपिका पदुकोण, मेरी कोम, विक्रांत मेस्सींसह विविध दिग्गज साधणार संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमातून संवाद साधतात. गेल्या आठ वर्षांपासून 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअरच्या वाटेवर महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेमधील यशासाठी तसेच तणावमुक्त राहण्यासाठी एकंदरीतच अभ्यासाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात.


आता पंतप्रधान मोदींचा 'परीक्षा पे चर्चा' हा संवाद कार्यक्रम यावर्षी नवीन स्वरूपात आणि शैलीत आयोजित केला जात आहे. यावर्षी ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधान मोदींसह बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, बॉक्सर मेरी कोम, अवनी लेखारा, ऋजुता दिवेकर, सोनाली सभरवाल, फूडफार्मर, विक्रांत मेस्सी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता आदी सहभागी होत आहेत. ते विद्यार्थ्यांना टिप्स देतील. २०२५ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ३ कोटी ५६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.



यंदा साडेतीन कोटी विद्यार्थ्यांची नोंदणी


२०१८ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. सातव्या आवृत्तीपेक्षा यंदा होणाऱ्या आठव्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षी यासाठी २.२६ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा कार्यक्रम पहिली तीन वर्षे नवी दिल्ली येथे टाउन-हॉल इंटरॅक्टिव्ह स्वरूपात आयोजित केला होता. कोरोना काळात चौथा कार्यक्रम दूरदर्शन आणि सर्व प्रमुख टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात ऑनलाइन आयोजित केला होता.



'परीक्षा पे चर्चा'चे यंदाचे आठवे वर्षे


'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे हे आठवे वर्षे आहे. या वर्षी तीन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे टाउन हॉल स्वरूपात आयोजित केला जातो.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या