Tamilnadu : धक्कादायक! तीन शिक्षकांचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

कृष्णगिरी : तामिळनाडूच्या कृष्णागिरीमधील बारगुर येथील शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थीनीवर ३ शिक्षकांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (डीईओ) तिन्ही आरोपी शिक्षकांना निलंबित केले आहे. तसेच त्यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण कायद्याच्या (पोस्को) विविध कलमांखाली त्यांना अटक केली आहे. संशयित आरोपी शिक्षकांना १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती कृष्णगिरीचे जिल्हाधिकारी सी दिनेश कुमार यांनी दिली.



पीडित मुलगी ३ जानेवारीपासून शाळेत येत नव्हती, त्यानंतर शाळेने तिच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली यानंतर शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलीच्या पालकांनी बारगुर ऑल वुमन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेला आवश्यक समुपदेशन देण्यात आले आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस स्टेशनच्या शिफारशीनुसार, पीडितेच्या पालकांनी बाल सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पीडितेला आवश्यक समुपदेशन देण्यात आले आहे. जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी आणि पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड

कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द

तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत,

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित