दहशतवादाविरोधातील लढाई तीव्र करा - अमित शाह

जम्मू-काश्मीर संदर्भात घेतली सुरक्षा आढावा बैठक


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील दहशतवादाच्या विरोधातील लढाई तीव्र करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह यांनी दोन दिवसांत 2 उच्चस्तरीय बैठका घेतल्या.


गृहमंत्र्यांनी मंगळवार आणि बुधवारी सलग दोन बैठकांमध्ये लष्कर, पोलिस, निमलष्करी दल आणि इतर उच्च अधिकाऱ्यांसोबत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या सतत आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाची परिसंस्था कमकुवत झाली आहे.


त्यांनी सर्व सुरक्षा एजन्सींना घुसखोर आणि दहशतवाद्यांशी अधिक कडकपणे व्यवहार करण्याचे निर्देश दिले आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याचे सांगितले. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा एजन्सींना 'शून्य घुसखोरी'च्या उद्देशाने दहशतवादाविरुद्धची लढाई तीव्र करण्यास सांगितले आहे.


आपले ध्येय दहशतवाद्यांना उखडून टाकणे असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे. अंमली पदार्थांच्या व्यापाराद्वारे दहशतवाद्यांना होणारे वित्तपुरवठा त्वरित आणि काटेकोरपणे रोखला पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांनी सलग दोन दिवस जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर इतक्या तपशीलवार चर्चा करण्याची ही पहिलीच वेळहोती.


या बैठकीला जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, डीजीपी नलिन प्रभात, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर उच्च लष्करी, पोलिस आणि नागरी अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या