दहशतवादाविरोधातील लढाई तीव्र करा - अमित शाह

जम्मू-काश्मीर संदर्भात घेतली सुरक्षा आढावा बैठक


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील दहशतवादाच्या विरोधातील लढाई तीव्र करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह यांनी दोन दिवसांत 2 उच्चस्तरीय बैठका घेतल्या.


गृहमंत्र्यांनी मंगळवार आणि बुधवारी सलग दोन बैठकांमध्ये लष्कर, पोलिस, निमलष्करी दल आणि इतर उच्च अधिकाऱ्यांसोबत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या सतत आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाची परिसंस्था कमकुवत झाली आहे.


त्यांनी सर्व सुरक्षा एजन्सींना घुसखोर आणि दहशतवाद्यांशी अधिक कडकपणे व्यवहार करण्याचे निर्देश दिले आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याचे सांगितले. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा एजन्सींना 'शून्य घुसखोरी'च्या उद्देशाने दहशतवादाविरुद्धची लढाई तीव्र करण्यास सांगितले आहे.


आपले ध्येय दहशतवाद्यांना उखडून टाकणे असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे. अंमली पदार्थांच्या व्यापाराद्वारे दहशतवाद्यांना होणारे वित्तपुरवठा त्वरित आणि काटेकोरपणे रोखला पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांनी सलग दोन दिवस जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर इतक्या तपशीलवार चर्चा करण्याची ही पहिलीच वेळहोती.


या बैठकीला जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, डीजीपी नलिन प्रभात, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर उच्च लष्करी, पोलिस आणि नागरी अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मुस्लिम महिलांनी केली श्रीरामाची आरती!

धर्म बदलू शकतो, पण पूर्वज आणि संस्कृती बदलू शकत नाही - नाजनीन अन्सारी वाराणसी : दिवाळीच्या सणादरम्यान, उत्तर

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण