Chandrayaan 4 Launched In 2027 : भारताची ‘चांद्रयान-४’ मोहिम २०२७ मध्ये - जितेंद्र सिंह

चंद्रावरील खडकाचे नमूने पृथ्वीवर आणणार


नवी दिल्ली : भारत २०२७ मध्ये चंद्रावरील खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी ‘चांद्रयान-४’ही मोहिम प्रक्षेपित करेल. अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका मुलाखतीत दिली. यासंदर्भात जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत २०२६ मध्ये खोल समुद्राचा शोध घेण्यासाठी 'समुद्रयान' मोहिम देखील प्रक्षेपित करेल आणि 'गगनयान' ही मोहीम देखील भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या तुकडीसह अवकाशात झेपावेल. चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे. यामध्ये हेवी-लिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटचे किमान २ वेगवेगळे प्रक्षेपण समाविष्ट असतील जे मोहिमेचे ५ वेगवेगळे घटक वाहून नेतील जे कक्षेत एकत्र केले जातील. तसेच गगनयान मोहिमेत भारतीय अंतराळवीरांनी विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.



भारत २०२६ मध्ये समुद्रयान देखील प्रक्षेपित करेल, ज्यामध्ये ३ शास्त्रज्ञांना खोल समुद्रात ६ हजार मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी नेले जाईल. ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या वेळेनुसार होईल, जी देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग ठरेल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

PMVBRY Employment : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना जाहीर; ३.५ कोटी नोकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा ९९,४४६ कोटींचा मेगा प्लॅन

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी आणि तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने

Delhi T1 Assault Case : दिल्ली विमानतळावर पायलटची गुंडगिरी! प्रवाशाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण; कॅप्टनवर तत्काळ...

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल १ वर एका वैमानिकाने प्रवाशाला

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.

केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ