
चंद्रावरील खडकाचे नमूने पृथ्वीवर आणणार
नवी दिल्ली : भारत २०२७ मध्ये चंद्रावरील खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी ‘चांद्रयान-४’ही मोहिम प्रक्षेपित करेल. अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका मुलाखतीत दिली. यासंदर्भात जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत २०२६ मध्ये खोल समुद्राचा शोध घेण्यासाठी 'समुद्रयान' मोहिम देखील प्रक्षेपित करेल आणि 'गगनयान' ही मोहीम देखील भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या तुकडीसह अवकाशात झेपावेल. चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे. यामध्ये हेवी-लिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटचे किमान २ वेगवेगळे प्रक्षेपण समाविष्ट असतील जे मोहिमेचे ५ वेगवेगळे घटक वाहून नेतील जे कक्षेत एकत्र केले जातील. तसेच गगनयान मोहिमेत भारतीय अंतराळवीरांनी विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे संगमनेर ...
भारत २०२६ मध्ये समुद्रयान देखील प्रक्षेपित करेल, ज्यामध्ये ३ शास्त्रज्ञांना खोल समुद्रात ६ हजार मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी नेले जाईल. ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या वेळेनुसार होईल, जी देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग ठरेल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.