महालक्ष्मी येथील बोरीच्या मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा

तब्बल १५० झोपड्या आणि बांधकामे हटवली


मुंबई(विशेष प्रतिनिधी)- महापालिका जी दक्षिण विभागातील महालक्ष्मी येथील जे. आर . बोरिचा रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुंबई महापालिकेने या मार्गावरील १५० झोपड्या तथा बांधकामांवर बुलडोझर चढवत कारवाई केली. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आल्याचे येथील ३०० मीटर परिसराची पदपथ चालण्यास मोकळी झाली आहे. महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.


मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मागील महिन्यात लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेडस्, दुकानांसमोरील वाढीव बांधकाम आदींवर मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी धडक कारवाई करत पदपथ, रस्‍ता मोकळा केल्यानंतर महालक्ष्मी येथील बोरीच्या मार्गांवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चढवला.



सीताराम मिल म्युनिसिपल स्कूलकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे येथील रहिवाशी, पादचारी, विद्यार्थी आणि पालक यांची प्रचंड गैरसोय व्हायची त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अनाधिकृत बांधकामांच्या तक्रारींची दखल घेत जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. येथील सुमारे १५० झोपड्या तथा अतिक्रमणे बुधवारी हटवण्यात आली.


एन एम जोशी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस समन्वयाने आणि सहकार्याने ही अतिक्रमणे हटवण्यात आली. या ६० पुरुष आणि ४० महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तर महापलिकचे २० अभियंते आणि ५० बीएमसी कामगारांनी या कारवाईत भाग घेतला होता. जे आर बोरिचा रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या ३०० मीटर लांबीच्या पदपथावरील अतिक्रमण काढून टाकण्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही