एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजीव सेठी यांची नियुक्ती

मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहे.एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल करण्यात आला आहे. महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद समोर आला होता. त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती.


आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागानं राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांच्याकडे देण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं अध्यक्षपद यापूर्वी परिवहन मंत्र्यांकडे असायचे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात नियमात बदल करुन भरत गोगावले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एसटीचं स्टेअरींग होतं. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयानं प्रताप सरनाईक यांना धक्का बसला आहे.

राज्यात महायुती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचं अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात नियमामध्ये बदल करुन एसटीचं अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आलं होतं. एसटीच्या उत्पन्नवाठीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच कर्नाटक राज्याचा दौरा केला होता. आता एसटी महामंडळाचं अध्यक्षपदी परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं आहे.त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयामुळे महायुतीत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल