Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या(Delhi Assembly Election 2025) ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यासाठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या, १९ हजार होमगार्ड आणि ३५ हजार ६२६ पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच मतदानासाठी २१ हजार ५०० हून अधिक मतपत्रिका युनिट्स आणि व्हीव्हीपॅट तयार करण्यात आले आहेत.


दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, या तिन्ही पक्षांनी त्यांचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील जनतेला विविध मोफत सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १३ हजार ७६६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.


दिल्लीत ८३.७६ लाख पुरुष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी ७३३ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुका खूप रोमांचक असल्याचे म्हंटले जात आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवणारा आम आदमी पक्ष यावेळी हॅट्रिकचे आश्वासन देत आहे, तर भाजपचा दावा आहे की त्यांचा पक्ष यावेळी केंद्रशासित प्रदेशात सत्ता काबीज करेल. यावेळी भाजप आणि आम आदमी पक्षाने अनेक पक्षांतरितांना तिकिटे दिली आहेत.



दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर काही काळानंतर, विविध वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्था दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध करतील.


दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६२ विधानसभा जागा जिंकल्या तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला