Palghar News : दहावीच्या निरोपसमारंभात शिक्षकानेच घेतला अखेरचा निरोप!

पालघर : दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये सध्या निरोप समारंभाचे वारे वाहत आहेत. अशातच पालघरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात भाषण करत असताना शिक्षकाला गहिवरुन आले. दाटून आलेला त्यांचा तो हुंदका त्यांच्यासाठी काळच ठरला. बोलता बोलता ते अचानक थांबले. भारावलेल्या वातावरणात सर्वजण यावेळी हळवे झाले होते. तोच काही क्षणात ते शिक्षक जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.


हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या या शिक्षकानेच या मुलांसह शाळेचा देखिल अखेरचा निरोप घेतला. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मनोर येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



पालघर तालुक्यातील मनोर येथे लालबहादूर शास्त्री शाळेत काल (दि. ४) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. या निरोप समारंभात अनेक शिक्षकांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. मुलांनीही यावेळेस शिक्षकांसाठी आदराप्रती भाषण दिले. दरम्यान समारंभ मोठ्या भावनिक वातावरणात सुरु असतानाच शिक्षक संजय लोहार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोडियमवर आले. भाषण करताना हळवे झालेले संजय लोहार भाषण देत असतानाच स्तब्ध झाले आणि काही क्षणातच पोडियमसह कोसळले.


संजय यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

१४२ दिवसांच्या योगनिद्रेनंतर जागे होतील श्री हरी विष्णू; 'या' राशींसाठी आहे अत्यंत शुभ काळ!

मुंबई : हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी लवकरच येत आहे. या दिवशी

चला हवा येऊ द्या' नंतर निलेश साबळे यांचा नवा अंदाज! महाराष्ट्रातील 'वहिनीं'साठी घेऊन येत आहेत 'वहिनीसाहेब सुपरस्टार' शो

मुंबई: 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोडून बाहेर पडलेले डॉ. निलेश साबळे आता एका नव्या