Palghar News : दहावीच्या निरोपसमारंभात शिक्षकानेच घेतला अखेरचा निरोप!

पालघर : दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये सध्या निरोप समारंभाचे वारे वाहत आहेत. अशातच पालघरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात भाषण करत असताना शिक्षकाला गहिवरुन आले. दाटून आलेला त्यांचा तो हुंदका त्यांच्यासाठी काळच ठरला. बोलता बोलता ते अचानक थांबले. भारावलेल्या वातावरणात सर्वजण यावेळी हळवे झाले होते. तोच काही क्षणात ते शिक्षक जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.


हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या या शिक्षकानेच या मुलांसह शाळेचा देखिल अखेरचा निरोप घेतला. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मनोर येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



पालघर तालुक्यातील मनोर येथे लालबहादूर शास्त्री शाळेत काल (दि. ४) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. या निरोप समारंभात अनेक शिक्षकांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. मुलांनीही यावेळेस शिक्षकांसाठी आदराप्रती भाषण दिले. दरम्यान समारंभ मोठ्या भावनिक वातावरणात सुरु असतानाच शिक्षक संजय लोहार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोडियमवर आले. भाषण करताना हळवे झालेले संजय लोहार भाषण देत असतानाच स्तब्ध झाले आणि काही क्षणातच पोडियमसह कोसळले.


संजय यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी