पुण्याहून मुंबईला येऊन केली आत्महत्या

मुंबई : एका महिलेने पुण्याहून मुंबईत येऊन आत्महत्या केली. या महिलेने मुलुंडमधील एका सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील घरातून उडी मारुन जीवन संपवले. आत्महत्या करणारी महिला ५३ वर्षांची होती. या महिलेला मधुमेह, हृदयविकार आणि डोळ्यांशी संबंधित समस्या होत्या.



मूळच्या पुण्यातील दौंडच्या सुनिता येवले (५३) मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे हैराण झालेल्या सुनिता मधुमेहावरील उपचाराच्या निमित्ताने मुलुंड येथे बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. वाढत्या आरोग्य समस्यांमुळे त्रस्त असलेल्या सुनिता यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.



सुनिता मागील २७ महिन्यांपासून मधुमेहाने त्रस्त होत्या. त्यांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्या डोळ्यांच्या आजाराशीही झुंज देत होत्या. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात सुनिता यांच्यावर उपचार होणार होते. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.



सुनिता यांनी सातव्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुनिता यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुनिता यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी पोलिसांनी सुनिता यांची बहीण, पती आणि मुलाचे जबाब नोंदवले आहेत. प्रदीर्घ आजारपणामुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या, त्यामुळेच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात