Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले रक्तानी रेखाटलेले चित्र

अहिल्यानगर : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांनी दिलेले विचार महाराष्ट्रातील माणसांच्या मनावर प्रेरित करणारे आहे.त्यांचे विचार घेवुन अनेकांनी राजकीय प्रवार सुरु केला. त्यांचे प्रखर विचार शिवसैनिकांना बळ देत होते.शिवसेना म्हणजे एक विचार.आणि शिवसैनिक म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्त्या ही ओळख संपूर्ण देशभरात होती.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व.आनंद दिघे नसले तरी त्यांची विचारधारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जीवंत ठेवली आहे.अहिल्यानगरचे माजी नगरसेवक शाम नळकांडे यांच्यावतीने चित्रकार गणेश जिंदम यांनी रक्तानी रेखाटलेले चित्र उपममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.



नगरसेवक शाम नळकांडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे,संपर्क प्रमुख दिलीप सातपुते,शहरप्रमुख सचिन जाधव,संभाजी कदम,बाबुशेठ टायरवाले आदि उपस्थित होते.


हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे चित्र गणेश जिंदम यांनी रेखाटले आहे.त्यांना हे चित्र रेखाटण्यासाठी ३ तास लागले.त्यांनी या अगोदर ही शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवासानिमित्ताने रक्ताने चित्र रेखाटले होते.त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुंबईला बोलावून त्यांचे कौतूक केले होते.गणेश जिंदम यांचे कलाक्षेत्रात मोठ योगदान आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये