दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या अपघातामध्ये केवळ वाहनांचे नुकसान झाले नसून दोन तरुणींचा नाहक बळी गेला आहे. सोलापूरातील मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ज्यात टेम्पोने दुचाकीला धडक दिली असून दुचाकीवर असलेल्या दोन जिवलग मैत्रिणींना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. या घटनेवर स्थानिकांनी संतप्त भावना दिसत आहेत.


अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची बारावीत शिकणारी मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. प्रज्ञा ही दुचाकीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या या भीषण अपघातात जिवाभावाच्या मैत्रिणींचा दुर्दैवी अंत झाला. या धडकेत प्रज्ञा जागीच ठार झाली तर स्नेहल गंभीर जखमी झाल्यामुळे तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रज्ञा ही नेताजी महाविद्यालयात शिकत होती तर स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात शिकत होती.


या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणींचे वय कमी असले तरी त्यांना गाडी चालवण्याची परवानगी कोणी दिली? हा प्रश्न येथे महत्त्वाचा असला तरी, समोरचा टेम्पो चालक कोणत्या वेगाने गाडी चालवत होता? गावातील रस्त्यांवर किती वेगाने गाडी चालवावी? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.



दरम्यान, पालघरच्या मोखाडा येथील चपलपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गाडीचा काल (२५ डिसेंबर) अपघात झाला होता. या अपघातात बारा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. हे सर्व विद्यार्थी शाळेच्या क्रीडा स्पर्धेसाठी एका पिकअप गाडी मधून स्पर्धेला जात होते. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या गाडीचा अपघात झाला. गाडीतील जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, गंभीर स्थिती असलेल्या काही विद्यार्थ्यांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, नाशिकच्या खाजगी रुग्णालयामध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलाच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून इतर किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना रात्रीच घरी पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य