Kalyan News : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि हत्या, विशाल - साक्षी तुरुंगात; मुलीच्या घरावर दगडफेक प्रकरणी विशालच्या सहकाऱ्यांना अटक

कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी विशाल गवळी आणि त्याची बायको साक्षी गवळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशातच आता विशाल गवळीच्या साथीदारांनी पीडित मुलीच्या घरावर दगडफेक करत दहशतीचे वातावरण पसरवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विशाल गवळीच्या साथीदारांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.



कल्याण पूर्वेत २३ डिसेंबर २०२४ रोजी १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर पोलिसांना तिचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणाने कल्याण- डोंबिवली शहर हादरून गेलं होत. या प्रकरणी विशाल गवळीला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. चौकशी झाल्यानंतर विशाल गवळीने त्याच्या पत्नीच्या मदतीने हा खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशालचा भूतकाळ गुन्हेगारी प्रवृत्तीतला आढळला.


विशाल जरी तुरुंगात असला तरी त्याच्या साथीदारांनी पीडित मुलीच्या घराबाहेर अपरात्री राडा केला. आमच्या माणसांना जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो आणि दाखवतो. अशा धमक्या देऊन दगडफेक करत घरासमोरील सामान इतस्ततः फेकून देत पातेले उचलून एका रहिवाशाच्या अंगावर फेकून शिवीगाळ केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी या विशाल गवळीच्या साथीदारांना खाकी हिसका दाखवत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विशाल आणि साक्षी गवळी यांना शिक्षा कधी होणार आणि पीडित मुलीला न्याय मिळणार का याकडे कल्याण वासियांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी