Anganwadi Bharti : १२वी पास अन् सरकारी नोकरी! अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील १०० दिवसांत अंगणवाडीमधील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात कामासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.



शिक्षण आणि वयोमर्यादा


महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सध्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. तसेच पदव्युतर, डी एड, बी एड आणि एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.


या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत अर्जप्रक्रिया सुरु झाली असून १८ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. तसेच या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नगर परिषद/नगर पंचायत / नगर पालिका / नगर पंचायत / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील असणे गरजेचे आहे. रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली