दहावीची परिक्षा झाल्यावर ‘वर्षा’वर जाणार; उलटसूलट चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचे आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी काम चालू आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. १७ तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ. पण इतक्या वेळा सारख्या चर्चा सुरू आहेत. मला तर वाटते, माझ्या स्तरावरील माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या या चर्चा सुरू आहेत," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्याबाबत सुरु असलेल्या उलटसूलट चर्चांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.



प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देण्यात आली. मात्र सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन महिने होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे शासकीय निवावस्थान वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरुन राज्याच्या राजकारणात विविध उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचे म्हटले. मात्र आता या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.



मीडिया वेड्यांचा बाजार होतोय...


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला याची गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एका प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला. मला असे वाटते की, अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात