दहावीची परिक्षा झाल्यावर ‘वर्षा’वर जाणार; उलटसूलट चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचे आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी काम चालू आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. १७ तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ. पण इतक्या वेळा सारख्या चर्चा सुरू आहेत. मला तर वाटते, माझ्या स्तरावरील माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या या चर्चा सुरू आहेत," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्याबाबत सुरु असलेल्या उलटसूलट चर्चांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.



प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देण्यात आली. मात्र सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन महिने होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे शासकीय निवावस्थान वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरुन राज्याच्या राजकारणात विविध उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचे म्हटले. मात्र आता या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.



मीडिया वेड्यांचा बाजार होतोय...


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला याची गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एका प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला. मला असे वाटते की, अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते