दहावीची परिक्षा झाल्यावर ‘वर्षा’वर जाणार; उलटसूलट चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचे आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी काम चालू आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. १७ तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ. पण इतक्या वेळा सारख्या चर्चा सुरू आहेत. मला तर वाटते, माझ्या स्तरावरील माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या या चर्चा सुरू आहेत," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्याबाबत सुरु असलेल्या उलटसूलट चर्चांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.



प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देण्यात आली. मात्र सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन महिने होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे शासकीय निवावस्थान वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरुन राज्याच्या राजकारणात विविध उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचे म्हटले. मात्र आता या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.



मीडिया वेड्यांचा बाजार होतोय...


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला याची गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एका प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला. मला असे वाटते की, अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई