Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून महत्त्वाचे विधान जाहीर

नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका संपली. आता ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन स्पर्धांमध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसणार आहेत. त्यानंतर मात्र भारताचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील म्हणजेच भारतीय खेळाडूआयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसतील. या टी-२० लीगचा नवीन हंगाम २१ मार्चपासून सुरू होईल. या हंगामाआधी चाहत्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व कोण करेल? आरसीबीच्या कर्णधाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा आरसीबीची (RCB) जबाबदारी घेऊ शकतो अशा बातम्या अनेक चालवल्या गेल्या आहेत. त्या बातम्यांना पुन्हा एकदा वेग येत आहे. या प्रकरणावर संघाकडून एक महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे.



चाहत्यांचा असा विश्वास आहे की, कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करू शकतो. पण याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही. फाफ डु प्लेसिसला करारमुक्त केल्यानंतर संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. यादरम्यान, आरसीबीच्या कर्णधारपदाच्या प्रश्नावर आरसीबीचे सीओओ राजेश मेनन यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले की, सध्या आम्ही काहीही निर्णय घेतलेला नाही. आमच्या संघात अनेक लीडर आहेत. कर्णधारपद सांभाळू शकतील असे ४-५ खेळाडू आहेत. त्यामुळे काय निर्णय घ्यावा याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही विचार करू आणि निर्णय घेऊ.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स