Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून महत्त्वाचे विधान जाहीर

नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका संपली. आता ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन स्पर्धांमध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसणार आहेत. त्यानंतर मात्र भारताचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील म्हणजेच भारतीय खेळाडूआयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसतील. या टी-२० लीगचा नवीन हंगाम २१ मार्चपासून सुरू होईल. या हंगामाआधी चाहत्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व कोण करेल? आरसीबीच्या कर्णधाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा आरसीबीची (RCB) जबाबदारी घेऊ शकतो अशा बातम्या अनेक चालवल्या गेल्या आहेत. त्या बातम्यांना पुन्हा एकदा वेग येत आहे. या प्रकरणावर संघाकडून एक महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे.



चाहत्यांचा असा विश्वास आहे की, कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करू शकतो. पण याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही. फाफ डु प्लेसिसला करारमुक्त केल्यानंतर संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. यादरम्यान, आरसीबीच्या कर्णधारपदाच्या प्रश्नावर आरसीबीचे सीओओ राजेश मेनन यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले की, सध्या आम्ही काहीही निर्णय घेतलेला नाही. आमच्या संघात अनेक लीडर आहेत. कर्णधारपद सांभाळू शकतील असे ४-५ खेळाडू आहेत. त्यामुळे काय निर्णय घ्यावा याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही विचार करू आणि निर्णय घेऊ.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या