इस्तिमा जमात कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करा

  74

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई : नवी मुंबई खारघर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इस्तिमा जमात या कार्यक्रमात मार्गदर्शकांकडून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे करण्यात आली असून या कार्यक्रमानंतर हिंदू तरुणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तरी या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.



मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवी मुंबई खारघर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान इस्तीमा जमात या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे संबंधित नेत्यांकडून देण्यात आली. त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर हिंदू तरुणांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले झाल्याचे प्रकार घडल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.


या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Comments
Add Comment

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत

यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी

ऑगस्ट अखेरीस जरांगे आणि हाके मुंबईत आमनेसामने ?

मुंबई : केंद्र सरकारने जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीची जातीची माहिती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR मी काढलाय का? दोघांनी एकत्र यावं अन् क्रिकेट खेळावं; आम्हाला काहीही फरक... : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी