इस्तिमा जमात कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करा

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई : नवी मुंबई खारघर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इस्तिमा जमात या कार्यक्रमात मार्गदर्शकांकडून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे करण्यात आली असून या कार्यक्रमानंतर हिंदू तरुणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तरी या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.



मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवी मुंबई खारघर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान इस्तीमा जमात या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे संबंधित नेत्यांकडून देण्यात आली. त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर हिंदू तरुणांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले झाल्याचे प्रकार घडल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.


या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Comments
Add Comment

राजपत्रात नावे घोषित न झाल्याने कोकण भवनातील नगरसेवकांची नोंदणीच लांबली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार.. जिथे युतीमध्ये लढलो तिथे महायुतीचा महापौर होणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल

कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार राऊतांनी दिवास्वप्ने पाहू नयेत - भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र

उबाठा सोडून शिवसेना,भाजपात गेलेल्या कुणी मिळवली विजयश्री

उबाठात राहूनही ९ जणांची उमेदवारी नाकारली, ९ जणांचा पराभव मुंबई (सचिन धानजी) : शिवसेनेत जुलै २०२२ रोजी मोठा राजकीय