मुंबईतले घर विकून सोनाक्षीने कमावले साडेआठ कोटी रुपये

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील घर विकून साडेआठ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असलेल्या सोनाक्षीने गुंतवणूक म्हणून वांद्रे पश्चिमेला एमजे शाह समुहाच्या एका संकुलात चार बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया ४६३२ चौरसफूट होता तर कार्पेट एरिया ४२११ चौरसफूट होता.



सोनाक्षी सिन्हाने '८१ - ऑरिएट' (81 Aureate, Bandra West, Mumbai) या ४.४८ एकर परिसरात पसरलेल्या संकुलात एक चार बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. हा फ्लॅट सोनाक्षीने मार्च २०२० मध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने १४ कोटी रुपयांत खरेदी केला होता. फ्लॅटसाठी सोनाक्षी सिन्हाने ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी अर्थात नोंदणी शुल्क आणि १.३५ कोटी रुपये स्टँप ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क भरले होते. सोनाक्षीने २०२५ मध्ये तिच्या मालकीचा '८१ - ऑरिएट'मधील १४ कोटींचा फ्लॅट २२.५० कोटी रुपयांत विकला. या व्यवहारात सोनाक्षीला साडेआठ कोटी रुपयांचा नफा झाला. रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सने या व्यवहाराच्या नोंदणीची छाननी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने १४ कोटींचा फ्लॅट २२.५० कोटी रुपयांत विकला आणि ६१ टक्के नफा कमावला.



सोनाक्षी प्रमाणेच अनेक श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिक रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवत आहेत. फक्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कधी करायची आणि विक्री कधी करायची हे समजणे आवश्यक आहे. ज्यांना हे समीकरण समजले त्यांनाच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून नफा कमावणे शक्य आहे.
Comments
Add Comment

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद