सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा, विकासकामांना वेग यावा, अशी अपेक्षा असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.



सिंधुदुर्ग जिल्हा आणखी विकसित आणि प्रगत बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारीने काम करूया, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवा. शेती, पर्यटन, पशुसंवर्धन या माध्यमातून जिल्ह्याचे अर्थकारण वाढवण्यावर भर द्यायला हवा. जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला.



यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार, नियोजन अधिकारी बुधावले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य