IND vs ENG: गौतम गंभीरची अग्निपरीक्षा सुरू...भारतीय संघ आता चॅम्पियन्सच्या ट्रॉफीच्या तयारीला

मुंबई: भारतीय संघ यावेळेस आपल्याच भूमीत इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. दोन्ही संघादरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने दमदार खेळ करताना ४-१ असा विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने यावेळी नेतृत्व केले होते. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडेची.


यासोबतच भारतीय संघ या महिन्यात आयसीसी चॅम्पियनशिप ट्ऱॉफी २०२५मध्येही खेळणार आहे. टीम इंडियाचे हे खरे मिशन आहे आणि यात हेड कोच गौतम गंभीरसह कर्णधार रोहित शर्माचीही अग्निपरीक्षा असणार आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वनडे मालिका असणार खास


मात्र त्याआधी भारतीय संघाला आपल्याच घरात इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीनुसार ही मालिका अतिशय खास असणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅटही वनडे असणार आहे.



अशातच गंभीर आणि रोहित इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्व प्रयोग करतील. सोबतच या मालिकेतून टीम इंडियाची तयारीही दिसून येणार आहे. एकीकडे आपण म्हणू शकतो की इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेद्वारे भारतीय संघाचे मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल.



भारत-इंग्लंड वनडे मालिका


पहिली वनडे ६ फेब्रुवारी - नागपूर
दुसरी वनडे - ९ फेब्रुवारी - कट्टक
तिसरी वनडे - १२ फेब्रुवारी - अहमदाबाद



इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल(उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण