IND vs ENG: गौतम गंभीरची अग्निपरीक्षा सुरू...भारतीय संघ आता चॅम्पियन्सच्या ट्रॉफीच्या तयारीला

मुंबई: भारतीय संघ यावेळेस आपल्याच भूमीत इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. दोन्ही संघादरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने दमदार खेळ करताना ४-१ असा विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने यावेळी नेतृत्व केले होते. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडेची.


यासोबतच भारतीय संघ या महिन्यात आयसीसी चॅम्पियनशिप ट्ऱॉफी २०२५मध्येही खेळणार आहे. टीम इंडियाचे हे खरे मिशन आहे आणि यात हेड कोच गौतम गंभीरसह कर्णधार रोहित शर्माचीही अग्निपरीक्षा असणार आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वनडे मालिका असणार खास


मात्र त्याआधी भारतीय संघाला आपल्याच घरात इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीनुसार ही मालिका अतिशय खास असणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅटही वनडे असणार आहे.



अशातच गंभीर आणि रोहित इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्व प्रयोग करतील. सोबतच या मालिकेतून टीम इंडियाची तयारीही दिसून येणार आहे. एकीकडे आपण म्हणू शकतो की इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेद्वारे भारतीय संघाचे मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल.



भारत-इंग्लंड वनडे मालिका


पहिली वनडे ६ फेब्रुवारी - नागपूर
दुसरी वनडे - ९ फेब्रुवारी - कट्टक
तिसरी वनडे - १२ फेब्रुवारी - अहमदाबाद



इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल(उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत