Delhi Election 2025: दिल्लीत प्रचार संपला, ५ फेब्रुवारीला मतदान

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Election 2025) सोमवारी संध्याकाळी ६ वाजता निवडणुकीचा प्रचार संपला. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल ८ वाजता जाहीर केला जाईल. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जनतेशी संवाद साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीचे १.५६ कोटी मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करतील.



एक्झिट पोलवर कधीपर्यंत बंदी?


याआधी निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलवर प्रतिबंध लावले आहेत. या संबंधामध्ये दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले आहेत.



मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ


दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ तयार करण्यात आले आहेत. ८३.७६ लाख पुरूष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. ७३३ मतदान बूथ हे दिव्यांग लोकांसाठी ठरवण्यात आले आहेत.



६९८० लोकांनी घरातून केले मतदान


वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची सुविधा आहे. या सुविधेंतर्गत पात्र मतदारांपैकी ६९८० लोकांनी आपले मतदान आधीच केले आहे. घरातून मतदानाची सुविधा २४ जानेवारीपासून सुरू झाली होती. ही सुविधा ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात