Delhi Election 2025: दिल्लीत प्रचार संपला, ५ फेब्रुवारीला मतदान

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Election 2025) सोमवारी संध्याकाळी ६ वाजता निवडणुकीचा प्रचार संपला. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल ८ वाजता जाहीर केला जाईल. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जनतेशी संवाद साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीचे १.५६ कोटी मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करतील.



एक्झिट पोलवर कधीपर्यंत बंदी?


याआधी निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलवर प्रतिबंध लावले आहेत. या संबंधामध्ये दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले आहेत.



मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ


दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ तयार करण्यात आले आहेत. ८३.७६ लाख पुरूष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. ७३३ मतदान बूथ हे दिव्यांग लोकांसाठी ठरवण्यात आले आहेत.



६९८० लोकांनी घरातून केले मतदान


वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची सुविधा आहे. या सुविधेंतर्गत पात्र मतदारांपैकी ६९८० लोकांनी आपले मतदान आधीच केले आहे. घरातून मतदानाची सुविधा २४ जानेवारीपासून सुरू झाली होती. ही सुविधा ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र