Delhi Election 2025: दिल्लीत प्रचार संपला, ५ फेब्रुवारीला मतदान

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Election 2025) सोमवारी संध्याकाळी ६ वाजता निवडणुकीचा प्रचार संपला. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल ८ वाजता जाहीर केला जाईल. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जनतेशी संवाद साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीचे १.५६ कोटी मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करतील.



एक्झिट पोलवर कधीपर्यंत बंदी?


याआधी निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलवर प्रतिबंध लावले आहेत. या संबंधामध्ये दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले आहेत.



मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ


दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ तयार करण्यात आले आहेत. ८३.७६ लाख पुरूष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. ७३३ मतदान बूथ हे दिव्यांग लोकांसाठी ठरवण्यात आले आहेत.



६९८० लोकांनी घरातून केले मतदान


वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची सुविधा आहे. या सुविधेंतर्गत पात्र मतदारांपैकी ६९८० लोकांनी आपले मतदान आधीच केले आहे. घरातून मतदानाची सुविधा २४ जानेवारीपासून सुरू झाली होती. ही सुविधा ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला