अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-२०मध्ये असे करणारा पहिला भारतीय

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. २ फेब्रुवारीला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तब्बल १५० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेवर ४-१ असा कब्जा केला.


वानखेडेच्या टी-२० सामन्यातील विजयाचा हिरो ठरला सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने ५४ बॉलवर १३५ धावा लुटल्या.यात त्याने १३ षटकार आणि ७ चौकार लगावले. अभिषेक शर्माने यानंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने तीन धावा देत दोन विकेटही मिळवल्या.



अभिषेक शर्मा असा पहिला भारतीय क्रिकेटर आहे ज्याने एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकण्यासोबतच विकेटही मिळवल्या. अभिषेक शर्मा भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज आहे. सोबतच अभिषेक भारतासाठी एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाजही आहे.


Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए