अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-२०मध्ये असे करणारा पहिला भारतीय

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. २ फेब्रुवारीला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तब्बल १५० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेवर ४-१ असा कब्जा केला.


वानखेडेच्या टी-२० सामन्यातील विजयाचा हिरो ठरला सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने ५४ बॉलवर १३५ धावा लुटल्या.यात त्याने १३ षटकार आणि ७ चौकार लगावले. अभिषेक शर्माने यानंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने तीन धावा देत दोन विकेटही मिळवल्या.



अभिषेक शर्मा असा पहिला भारतीय क्रिकेटर आहे ज्याने एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकण्यासोबतच विकेटही मिळवल्या. अभिषेक शर्मा भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज आहे. सोबतच अभिषेक भारतासाठी एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाजही आहे.


Comments
Add Comment

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार

भारत-न्यूझीलंड मालिकेचा निकाल इंदूरच्या ‘होळकर’वर

शुभमन गिलसाठी प्रतिष्ठेची लढाई, विजयाची परंपरा राखण्याचे आव्हान इंदूर : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२६ वर्षाची

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय