अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-२०मध्ये असे करणारा पहिला भारतीय

  182

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. २ फेब्रुवारीला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तब्बल १५० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेवर ४-१ असा कब्जा केला.


वानखेडेच्या टी-२० सामन्यातील विजयाचा हिरो ठरला सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने ५४ बॉलवर १३५ धावा लुटल्या.यात त्याने १३ षटकार आणि ७ चौकार लगावले. अभिषेक शर्माने यानंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने तीन धावा देत दोन विकेटही मिळवल्या.



अभिषेक शर्मा असा पहिला भारतीय क्रिकेटर आहे ज्याने एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकण्यासोबतच विकेटही मिळवल्या. अभिषेक शर्मा भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज आहे. सोबतच अभिषेक भारतासाठी एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाजही आहे.


Comments
Add Comment

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.