India Women Cricket Team : भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंडर-19 टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयाचा झेंडा रोवला

मलेशिया : क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने दारुण पराभव केला. भारताने २०२३ मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे पहिले विजेतेपद जिंकले होते.



या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आफ्रिकेचा संपूर्ण संघ २० षटकांत फक्त ८२ धावा करून सर्वबाद झाला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक २३ धावा केल्या. त्यांच्याशिवाय, जेम्मा बोथा यांनी १६ आणि फेय काउलिंग यांनी १५ धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. गोंगडी त्रिशाने ४ षटकांत फक्त १५ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शबनम शकीलनेही एका फलंदाजाची विकेट घेण्यात यश मिळवले.



२०२५ च्या अंडर १९ महिला टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने एकतर्फी सामने जिंकले. त्यांनी वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव करून सुरुवात केली. यानंतर, भारतीय संघाने मलेशियाचा १० विकेट्सने पराभव केला आणि नंतर श्रीलंकेचा ६० धावांनी पराभव केला. त्याच वेळी, त्यांनी बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने आणि स्कॉटलंडविरुद्ध १५० धावांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडचा ० विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर आता अंतिम सामनाही सहज जिंकला आहे. दरम्यान आता क्रिकेट चाहते भारतीय महिला संघाच्या विजयावर खुश झाले आहेत.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या