माहीममधील १३ मराठी कुटुंबावर एसआरए प्राधिकरणाची कारवाई

मुंबई : माहिममधील भंडार गल्लीतील १३ बांधकामांवर मुंबई झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व कुटुंबांना मिनाताई ठाकरे एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये पात्र भाडेकरु म्हणून सदनिका असल्याचे सांगितले जाते, परंतु, या गृहनिर्माण संस्थेमध्ये सदनिका उपलब्ध करून न देता यासर्व मराठी कुटुंबांच्या घरांवर प्राधिकरणाने बुलडोझर चढवला. दादरमधील दहा गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला असून या सर्व प्रकल्पांची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत होते, त्याचवेळी माहिममधील भंडार गल्लीतील १३ मराठी कुटुंबांच्या घरांवर एसआरए प्राधिकरणाने बुलडोझर चढवून त्यांना बेघर केले गेले.


माहिममधील भंडार गल्लीतील मिनाताई ठाकरे एसआरए गृहनिर्माण संस्थेतील टीपी रोडवरील १३ झोपडीधारक हे शांती धर्मा को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी व हरिश्चचंद्र को ऑप सोसायटी यांच्या प्रवेशद्वाराजवळ अजुनही वास्तव्यास असल्याने या झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. या रिट याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश पारित केले होते.



त्यानंतर आचारसंहितेअभावी ही कारवाई न झाल्याने याठिकाणी १३ झोपडीधारक हे सहकार्य करत नसल्याने बुधवारपर्यंत या झोपड्या रिकाम्या करून द्याव्यात अशाप्रकारच्या सूचना एसआरए प्राधिकरणाने दिल्या होत्या.


प्राधिकरणाच्या कारवाईत विसंगती


परंतु या झोपड्या रिकाम्या न केल्याने बुधवारी यासर्व घरांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी विशेष पोलिस फौजफाटा घेऊन प्राधिकरणाचे अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हे तैनात झाले आणि त्यांनी या सर्व बांधकामांवर महापालिकेच्या मदतीने बुलडोझर चढवून कारवाई केली. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी एसआरए प्राधिकारणाने मिनाताई एसआरए गृहनिर्माण संस्थेतील घुसखोरांची यादी जाहीर केली. यामध्ये काही कुटुंबांनी आली कागदपत्रे सादर केल्यानंतरही २० घुसखोर आढळून आले. त्यामुळे या घुसखोरांना बाहेर काढून कारवाई केलेल्या आणि अनेक वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असलेल्या १३ कुटुंबांचे पुनर्वसन करता येवू शकते. परंतु प्राधिकरणाने विकासकावर कारवाई न करता तसेच घुसखोरांवरच बाहेर न काढता मराठी कुटुंबांवर अन्याय केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कारवाईत विसंगती आढळून येत आहे.


या कारवाईचा तीव्र निषेध करून जर या कुटुंबांची घरे मिनाताई ठाकरे आहेत तर मग त्या घरांचा ताबा त्यांना न देता त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बेघर का केले जाते. जर इमारतीत २० घुसखोर आहेत,असे दिसून आले. तर मग त्यांच्यावर कारवाई करून त्या सदनिकांमध्ये कारवाई करण्यात आलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करायला हवे होते. पण घुसखोरांवर कारवाई करायची नाही आणि ज्याच्या दोन पिढ्या याठिकाणी राहिल्या, त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना किमान आपले कर्तव्य तरी प्राधिकरणाने पार पाडायला हवे होते असे म्हटले आहे. - शीतल देसाई, भाजपाच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा

Comments
Add Comment

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर