Delhi Assembly Election : आपच्या सात आमदारांचा केजरीवालांना ‘दे धक्का’!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी (Delhi Assembly Election) सात आमदारांनी एकाच दिवशी पक्षाची प्राथमिक सदस्यता सोडल्याने आम आदमी पार्टी (आप)ला मोठा धक्का बसला आहे. या आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषि, कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल, पालमचे आमदार भावना गौड़, महरौलीचे आमदार नरेश यादव यांचा समावेश आहे. या निर्णयाने 'आप'च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



या आमदारांच्या पक्ष बदलामुळे पार्टीच्या नेतृत्वावर आणि त्याच्या भवितव्यासाठी संकट निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीने ज्या ईमानदारीच्या विचारधारेवर आधारित असलेल्या सत्तेसाठी काम केले होते, त्या विचारधारेपासून पार्टी सध्या किती दूर गेली आहे, हे या सात आमदारांच्या सोडण्याच्या निर्णयातून स्पष्ट होईल. पक्षाच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय वर्तुळात या घटनाक्रमावर विविध चर्चा सुरू आहेत. काही नेत्यांनी पार्टीच्या नेतृत्वावर टीका केली आहे, तर काहींनी या निर्णयाला 'आप'च्या अंतर्गत फुटीचे कारण ठरवले आहे.


पक्ष सोडलेल्या आमदारांमध्ये महरौलीचे आमदार नरेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, आम आदमी पार्टी ईमानदारीच्या राजकारणासाठी जॉइन केली होती, पण आता पक्षात इमानदारीचे काहीच दिसत नाही. महरौलीच्या जनतेने मला सांगितले की हा पक्ष सोडायला हवा, कारण त्यांनी आमच्याशी फसवणूक केली आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या