Delhi Assembly Election : आपच्या सात आमदारांचा केजरीवालांना ‘दे धक्का’!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी (Delhi Assembly Election) सात आमदारांनी एकाच दिवशी पक्षाची प्राथमिक सदस्यता सोडल्याने आम आदमी पार्टी (आप)ला मोठा धक्का बसला आहे. या आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषि, कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल, पालमचे आमदार भावना गौड़, महरौलीचे आमदार नरेश यादव यांचा समावेश आहे. या निर्णयाने 'आप'च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



या आमदारांच्या पक्ष बदलामुळे पार्टीच्या नेतृत्वावर आणि त्याच्या भवितव्यासाठी संकट निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीने ज्या ईमानदारीच्या विचारधारेवर आधारित असलेल्या सत्तेसाठी काम केले होते, त्या विचारधारेपासून पार्टी सध्या किती दूर गेली आहे, हे या सात आमदारांच्या सोडण्याच्या निर्णयातून स्पष्ट होईल. पक्षाच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय वर्तुळात या घटनाक्रमावर विविध चर्चा सुरू आहेत. काही नेत्यांनी पार्टीच्या नेतृत्वावर टीका केली आहे, तर काहींनी या निर्णयाला 'आप'च्या अंतर्गत फुटीचे कारण ठरवले आहे.


पक्ष सोडलेल्या आमदारांमध्ये महरौलीचे आमदार नरेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, आम आदमी पार्टी ईमानदारीच्या राजकारणासाठी जॉइन केली होती, पण आता पक्षात इमानदारीचे काहीच दिसत नाही. महरौलीच्या जनतेने मला सांगितले की हा पक्ष सोडायला हवा, कारण त्यांनी आमच्याशी फसवणूक केली आहे.

Comments
Add Comment

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत