Delhi Assembly Election : आपच्या सात आमदारांचा केजरीवालांना ‘दे धक्का’!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी (Delhi Assembly Election) सात आमदारांनी एकाच दिवशी पक्षाची प्राथमिक सदस्यता सोडल्याने आम आदमी पार्टी (आप)ला मोठा धक्का बसला आहे. या आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषि, कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल, पालमचे आमदार भावना गौड़, महरौलीचे आमदार नरेश यादव यांचा समावेश आहे. या निर्णयाने 'आप'च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



या आमदारांच्या पक्ष बदलामुळे पार्टीच्या नेतृत्वावर आणि त्याच्या भवितव्यासाठी संकट निर्माण झाले आहे. आम आदमी पार्टीने ज्या ईमानदारीच्या विचारधारेवर आधारित असलेल्या सत्तेसाठी काम केले होते, त्या विचारधारेपासून पार्टी सध्या किती दूर गेली आहे, हे या सात आमदारांच्या सोडण्याच्या निर्णयातून स्पष्ट होईल. पक्षाच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय वर्तुळात या घटनाक्रमावर विविध चर्चा सुरू आहेत. काही नेत्यांनी पार्टीच्या नेतृत्वावर टीका केली आहे, तर काहींनी या निर्णयाला 'आप'च्या अंतर्गत फुटीचे कारण ठरवले आहे.


पक्ष सोडलेल्या आमदारांमध्ये महरौलीचे आमदार नरेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, आम आदमी पार्टी ईमानदारीच्या राजकारणासाठी जॉइन केली होती, पण आता पक्षात इमानदारीचे काहीच दिसत नाही. महरौलीच्या जनतेने मला सांगितले की हा पक्ष सोडायला हवा, कारण त्यांनी आमच्याशी फसवणूक केली आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील