Kalyan - Shilphata Road : कल्याण - शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद!

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कल्याण - शिळफाटा रस्ता पाच दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातली अधिसूचना लवकरच प्रसिध्द केली जाईल.



मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण - शिळफाटा रस्ता निळजे उड्डाणपुलाच्या कामासाठी ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.शिळफाटा रस्त्यावरील सततच्या वर्दळीत ही कामे करणे शक्य नसल्याने या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


दिल्ली-जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपिरिया मॉलजवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाखालून जाणार आहे.




पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे:



● कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाणपुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा.


● शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने जावे.


● बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहनांनी काटई नाका येथे न येता खोणी गावात वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे.


● हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे.



दरम्यान कल्याण - शिळफाटा रस्ता बंद केल्यामुळे पाच दिवस नागरिकांना हाल सोसावे लागणार आहेत.

Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या