भारत वि इंग्लंड आज चौथा सामना पुण्यात, भारत विजयी आघाडी घेणार का?

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्याच पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज म्हणजेच शुक्रवारी खेळवला जात आहे. टीम इंडिया मालिकेत सध्या २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकातामध्ये खेळवण्यात आला होता. यात भारताने ७ विकेटनी विजय मिळवला होता. त्यानंतर चेन्नईमध्ये टी-२०मध्ये भारताने इंग्लंडला २ विकेटनी हरवले होते.


दरम्यान, इंग्लंडने पलटवार करताना राजकोट टी-२०मध्ये भारताला २६ धावांनी हरवले. आता भारतीय संघाचे लक्ष्य पुणे टी-२० सामना जिंकत मालिका आपल्या नावावर करण्याचे असेल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.



प्लेईंग ११मध्ये होऊ शकतात हे २ बदल


या सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग ११वर सगळ्यांची नजर असेल. सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. अर्शदीप सिंहचे या सामन्यातून पुनरागमन होऊ शकते. अर्शदीपला राजकोटमधील सामन्यात आराम दिला होता. याशिवाय प्लेईंग ११मध्ये ऑलराऊंडर शिवम दुबेचीही एंट्री होऊ शकते. शिवमला नितीश कुमारच्या जागी स्क्वॉडमध्ये सामील केले होते.



अर्शदीपला या सामन्यात रवी बिश्नोईच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. बिश्नोई गेल्या सामन्यात खूपच महागडा ठरला होता. त्याने चार षटकांत ४६ धावा दिल्या होत्या. तर या मालिकेत त्याला केवळ एकच विकेट मिळवता आली आहे. शिवम दुबेला ध्रुव जुरेलच्या जागी संधी मिळू शकते. त्याने दोन सामने खेळत केवळ ६ धावा केल्या.



भारताचा संघ


सूर्यकुमार यादव(कर्णधार), संजू सॅमसन(विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमणदीप सिंह, शिवम दुबे, अक्षऱ पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह.


Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या