भारत वि इंग्लंड आज चौथा सामना पुण्यात, भारत विजयी आघाडी घेणार का?

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्याच पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज म्हणजेच शुक्रवारी खेळवला जात आहे. टीम इंडिया मालिकेत सध्या २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकातामध्ये खेळवण्यात आला होता. यात भारताने ७ विकेटनी विजय मिळवला होता. त्यानंतर चेन्नईमध्ये टी-२०मध्ये भारताने इंग्लंडला २ विकेटनी हरवले होते.


दरम्यान, इंग्लंडने पलटवार करताना राजकोट टी-२०मध्ये भारताला २६ धावांनी हरवले. आता भारतीय संघाचे लक्ष्य पुणे टी-२० सामना जिंकत मालिका आपल्या नावावर करण्याचे असेल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.



प्लेईंग ११मध्ये होऊ शकतात हे २ बदल


या सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग ११वर सगळ्यांची नजर असेल. सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. अर्शदीप सिंहचे या सामन्यातून पुनरागमन होऊ शकते. अर्शदीपला राजकोटमधील सामन्यात आराम दिला होता. याशिवाय प्लेईंग ११मध्ये ऑलराऊंडर शिवम दुबेचीही एंट्री होऊ शकते. शिवमला नितीश कुमारच्या जागी स्क्वॉडमध्ये सामील केले होते.



अर्शदीपला या सामन्यात रवी बिश्नोईच्या जागी प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. बिश्नोई गेल्या सामन्यात खूपच महागडा ठरला होता. त्याने चार षटकांत ४६ धावा दिल्या होत्या. तर या मालिकेत त्याला केवळ एकच विकेट मिळवता आली आहे. शिवम दुबेला ध्रुव जुरेलच्या जागी संधी मिळू शकते. त्याने दोन सामने खेळत केवळ ६ धावा केल्या.



भारताचा संघ


सूर्यकुमार यादव(कर्णधार), संजू सॅमसन(विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमणदीप सिंह, शिवम दुबे, अक्षऱ पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह.


Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए