Fire : प्रयागराजमध्ये चाललंय तरी काय? आधी आग, मग चेंगराचेंगरी आता पुन्हा आग!

महाकुंभात चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा परिसरात अग्नितांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!

१९ जानेवारीला लागलेल्या आगीत जळाले होते १८० पंडाल


प्रयागराज : महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज भीषण आग (fire) लागली आहे. प्रयागराज येथील सेक्टर २२ मध्ये ही आग लागली असून या आगीत १५ टेन्ट जळून खाक झाले आहेत.





महाकुंभ नगरीत अग्निशमन कार्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह ४ आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर्स तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये व्हिडिओ-थर्मल इमेजिंग सारख्या प्रगत प्रणाली आहेत. बहुमजली आणि उंच तंबूंमध्ये आग विझवण्यासाठी याचा वापर केला जातो. एडब्ल्यूटी ३५ मीटर उंचीपर्यंत आग विझवू शकते.





महाकुंभमेळा परिसर अग्निमुक्त करण्यासाठी, येथे ३५० हून अधिक अग्निशमन दल, २००० हून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ, ५० अग्निशमन केंद्रे आणि २० अग्निशमन चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. रिंगण आणि तंबूंमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत. तरीही याठिकाणी आज दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली.



उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज, गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. छतनाग घाट नागेश्वर घाटच्या सेक्टर २२ मधील आगीच्या घटनेत तंबू जळून खाक झाले आहेत. दरम्यान आग विझवण्यात आली असून यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.


छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आज दुपारी एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्‍या जवानांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. आगीच्‍या दुर्घटनेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे महाकुंभ मेळा परिसरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्‍या दुर्घटनाचा त्‍यांनी आढावा घेतला. बुधवारी महाकुंभमेळ्यात झालेल्‍या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ६० भाविक जखमी झाले. यातील ३६ जणांवर रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.


यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक तंबू भस्मसात झाले होते. सिलेंडरमधील गळतीमुळे ही दुर्घटना झाली होती.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी