Ranji Trophy 2025 : विराटला रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी

नवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या विराट कोहलीला पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी जमली होती.यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. तर काही फॅन्स जखमी झाले आहेत.



रणजी करंडक स्पर्धेत रेल्वेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने १२ वर्षात प्रथमच प्रथम श्रेणी स्पर्धेत मैदानात पुनरागमन केले. आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमबाहेर आले होते. फॅन्स पाहाटे ३ वाजल्यापासून स्टेडियमच्या गेट नंबर १६ समोर उभे होते. तेथील सुरक्षारक्षकांसाठी हे सारं अनपेक्षित होतं. त्यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये काही चाहते जखमी झाल्याने गोंधळ उडाला. हा जमाव एकमेकांना ढकलत होता आणि ज्यामुळे एंट्री गेटजवळ दोन पंखे पडले आणि चाहते जखमी झाले. पोलिसांच्या दुचाकीचे नुकसान झाले आणि अनेकांचे बूट मागे राहिले. या गोंधळात किमान तीन जण जखमी झाले.



विराट कोहली १२ वर्ष ८६ दिवसानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळतोय. विराटने त्याचा २३वा रणजी करंडक स्पर्धेतील सामना वयाच्या २४व्या वर्षी खेळला होता आणि त्यानंतर ३६ वर्ष ८६ दिवसांचा विराट आज २४वा रणजी सामना खेळतोय. त्याला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी गर्दीच्या परिस्थितीत गुदमरू नये म्हणून आपल्या मुलांना खांद्यावर उचलले होते. शेवटी जेव्हा गेट उघडले तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले.


Comments
Add Comment

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.