IND vs ENG : राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव

राजकोट: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान भारताचा डाव ९ बाद १४६ धावांवर आटोपला. इंग्लंडने या सामन्यात २६ धावांनी विजय मिळवला. सोबतच पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ असे आव्हान जिवंत ठेवले.


इंग्ंलडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून हार्दिक पांड्याने जबरदस्त ४० धावांची खेळी केली मात्र त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्याव्यतिरिक्त अभिषेक शर्माने २४ धावा केल्या. बाकी कोणालाही चांगली धावसंख्या करता आली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव १४ धावांवर परतला.


याआधी इंग्लंडने २० षटकांत ९ विकेट गमावताना १७१ धावा केल्या. टीम इंडियासाठी वरूण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. तर इंग्लंडसाठी बेन डकेटने अर्धशतक लगावले. त्याने २८ चेंडूचा सामना करताना ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार लावले. तर दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोनने ४३ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. जोस बटलरने २४ धावा करत योगदान दिले.



५ विकेटसह वरूण चक्रवर्तीने रचला इतिहास


वरूण चक्रवर्तीने ५ विकेट घेण्यासोबतच इतिहास रचला आहे. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्वीपक्षीय टी-२० मालिकेत १०हून अधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी युजवेंद्रच्या नावावर एका मालिकेत सर्वाधिक ८ विकेट घेण्याचा मान होता. इंग्लंडकडून एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड क्रिस जॉर्डनच्या नावावर आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे