Bollywood Drama Queen : ड्रामा क्वीन आता पाकड्याशी लग्न करणार; दुबईत स्थायिक होणार!

मुंबई : एकीकडे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोटाचं सत्र सुरु आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता बॉलीवूडची ड्रामा क्वीन ओळख असलेली राखी सावंत सुद्धा लवकरच तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. राखी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत चर्चेत असते. राखीने तिच्या अलिकडच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या चांगल्या लग्नाच्या मागण्यांबद्दलही सांगितलंय. पण यावेळेस तिला लग्न भारतात करायचं नसून पाकिस्तानात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.



एका माध्यमाशी बोलताना राखी म्हणाली, "मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि माझे चाहतेही तिथे आहेत. अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडप्यांनी लग्न केलं आहे आणि ते अमेरिका आणि दुबईमध्ये स्थायिक झाले असून चांगलं जीवन जगत आहेत. या प्रकारच्या विवाहामुळे दोन्ही देशांमधील शांतता आणि समजूतदारपणा वाढतो. मला पाकिस्तानकडून खूप प्रस्ताव येत आहेत. जेव्हा मी पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की, माझ्या मागील दोन्ही लग्नांमध्ये माझा किती छळ झाला होता. भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय काहीही करू शकत नाहीत. प्रियकर दोदी खानबद्दल बोलताना राखी म्हणाली की, तो एक अभिनेता आणि सोबतच एक पोलिस अधिकारी सुद्धा आहे. राखी म्हणाली, 'लग्न पाकिस्तानमध्ये होईल. रिसेप्शन भारतात होईल, हनिमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ आणि दुबईत स्थायिक होऊ."


राखीच्या या विधानानंतर तिचे चाहते खुश झाले आहेत. दरम्यान आता राखीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची