Bollywood Drama Queen : ड्रामा क्वीन आता पाकड्याशी लग्न करणार; दुबईत स्थायिक होणार!

मुंबई : एकीकडे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोटाचं सत्र सुरु आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता बॉलीवूडची ड्रामा क्वीन ओळख असलेली राखी सावंत सुद्धा लवकरच तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. राखी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत चर्चेत असते. राखीने तिच्या अलिकडच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या चांगल्या लग्नाच्या मागण्यांबद्दलही सांगितलंय. पण यावेळेस तिला लग्न भारतात करायचं नसून पाकिस्तानात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.



एका माध्यमाशी बोलताना राखी म्हणाली, "मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि माझे चाहतेही तिथे आहेत. अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडप्यांनी लग्न केलं आहे आणि ते अमेरिका आणि दुबईमध्ये स्थायिक झाले असून चांगलं जीवन जगत आहेत. या प्रकारच्या विवाहामुळे दोन्ही देशांमधील शांतता आणि समजूतदारपणा वाढतो. मला पाकिस्तानकडून खूप प्रस्ताव येत आहेत. जेव्हा मी पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की, माझ्या मागील दोन्ही लग्नांमध्ये माझा किती छळ झाला होता. भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय काहीही करू शकत नाहीत. प्रियकर दोदी खानबद्दल बोलताना राखी म्हणाली की, तो एक अभिनेता आणि सोबतच एक पोलिस अधिकारी सुद्धा आहे. राखी म्हणाली, 'लग्न पाकिस्तानमध्ये होईल. रिसेप्शन भारतात होईल, हनिमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ आणि दुबईत स्थायिक होऊ."


राखीच्या या विधानानंतर तिचे चाहते खुश झाले आहेत. दरम्यान आता राखीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल