Bollywood Drama Queen : ड्रामा क्वीन आता पाकड्याशी लग्न करणार; दुबईत स्थायिक होणार!

मुंबई : एकीकडे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोटाचं सत्र सुरु आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता बॉलीवूडची ड्रामा क्वीन ओळख असलेली राखी सावंत सुद्धा लवकरच तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. राखी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत चर्चेत असते. राखीने तिच्या अलिकडच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या चांगल्या लग्नाच्या मागण्यांबद्दलही सांगितलंय. पण यावेळेस तिला लग्न भारतात करायचं नसून पाकिस्तानात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.



एका माध्यमाशी बोलताना राखी म्हणाली, "मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि माझे चाहतेही तिथे आहेत. अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडप्यांनी लग्न केलं आहे आणि ते अमेरिका आणि दुबईमध्ये स्थायिक झाले असून चांगलं जीवन जगत आहेत. या प्रकारच्या विवाहामुळे दोन्ही देशांमधील शांतता आणि समजूतदारपणा वाढतो. मला पाकिस्तानकडून खूप प्रस्ताव येत आहेत. जेव्हा मी पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की, माझ्या मागील दोन्ही लग्नांमध्ये माझा किती छळ झाला होता. भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय काहीही करू शकत नाहीत. प्रियकर दोदी खानबद्दल बोलताना राखी म्हणाली की, तो एक अभिनेता आणि सोबतच एक पोलिस अधिकारी सुद्धा आहे. राखी म्हणाली, 'लग्न पाकिस्तानमध्ये होईल. रिसेप्शन भारतात होईल, हनिमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ आणि दुबईत स्थायिक होऊ."


राखीच्या या विधानानंतर तिचे चाहते खुश झाले आहेत. दरम्यान आता राखीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Comments
Add Comment

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे