Mauni Amavasya : तिसऱ्या अमृतस्नानासाठी प्रशासन सज्ज; मौनी अमावस्येला भाविकांवर आकाशातून पुष्पवृष्टी

आतापर्यंत १७ कोटींहून अधिक भाविकांचे स्नान


प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात उद्या, बुधवारी तिसरे अमृतस्नान (शाही) होणार आहे. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर (Mauni Amavasya) होणाऱ्या या स्नानासाठी कोट्यवधी लोक अपेक्षित असून त्यानुषंगाने प्रशासन सज्ज आहे.


कुंभमेळ्याचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर त्याला ज्योतिषशास्त्रीय आधार देखील आहे. कुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा येतो, जो भारतातील ४ प्राचीन शहरे, हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन येथे आयोजित केला जातो. या संगमाच्या पवित्र पाण्यात पवित्र स्नान करण्याची आणि पूजा करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. समुद्रमंथनातून मिळालेले अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये १२ वर्षे युद्ध झाले. या युद्धादरम्यान ज्या ठिकाणी मडक्यातून अमृताचे थेंब पडले त्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या युद्धामुळे, दर १२ वर्षांनी एकदा कुंभ येतो. महाकुंभातील स्नानाला अमृत (शाही) स्नान म्हणून ओळखले जाते.


प्रयागराज येथे १३ जानेवारी २०२५ रोजी प्रारंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत १७ कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. महा महाकुंभातील मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानापूर्वीच, एकूण स्नान करणाऱ्यांची संख्या १७ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार, २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २.३९ कोटी लोकांनी संगमात स्नान केले होते. यामध्ये सुमारे १० लाख कल्पवासी सहभागी झाले होते. तर २७ जानेवारीपर्यंत आंघोळ करणाऱ्यांची एकूण संख्या १४.७६ कोटी होती. अशाप्रकारे, आतापर्यंत १७ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात स्नान केले आहे.



प्रयागराज कुंभमेळ्यात एकूण ६ अमृत स्नाने होतील. महाकुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान १३ जानेवारीला, दुसरे अमृत स्नान १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीला, तिसरे स्नान २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला, चौथे शाही स्नान २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला, पाचवे शाही स्नान माघ पौर्णिमेला १२ फेब्रुवारी रोजी होईल आणि शेवटचे शाही स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होईल.


दरम्यान उद्या, बुधवारी २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर अमृत स्नान उत्सवानिमित्त, उत्तरप्रदेश सरकार भाविकांवर पुष्पवृष्टी करणार आहे. सर्व घाटांवर पुष्पवृष्टीची तयारी सुरू आहे. दिवसातून ५ ते ६ वेळा फुलांचा वर्षाव केला जाईल.


सर्वप्रथम, सकाळी ६.३० ते ७ या वेळेत, आकाशातून भाविकांवर फुलांचा वर्षाव होईल. भाविकांची गर्दी लक्षात घेता, पुष्पवृष्टीचे चक्र वाढू शकते अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला