Online Gaming Sucide News : ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागून १७ वर्षीय तरुणीने केला जीवनाचा अखेर

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यावरून काही उलगडे होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



'ब्लू व्हेल'सारख्या प्राणघातक खेळांमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशातच आता एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केली आहे. नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हि तरुणी इंटरनेटवर मृत्यूबाबत वाचायला लागली. मृत्यूनंतर काय होते, याची उत्सूकता तिला निर्माण झाली. ती रशियन संस्कृतीबाबतही इंटनेटवरून माहिती घेत होती. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं पोलिसांचा दावा आहे. मात्र तिच्या आत्महत्येमागचं ठोस कारण अद्यापही समोर आलं नसून रविवारी रात्रीच्या सुमारास ती ऑनलाईन गेम खेळत होती. सोमवारी सकाळी पालक उठल्यावर मुलगी काहीच प्रतिसाद देत नसल्याने तिच्या खोलीत गेले असता तिथे त्यांना ती रक्त बंबाळ अवस्थेत सापडली.मिळालेल्या माहितीनुसार आधी चाकूने हातावर क्रॉसचे चिन्ह काढले. त्यानंतर तिने नस कापली. नस कापल्यानंतर तिने चाकूने गळा चिरला. आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद