Smartphone: किती वेळ स्मार्टफोन वापरल्याने खराब होतात डोळे? जाणून घ्या

  67

मुंबई: आजकाल अधिकतर लोकांकडे स्मार्टफोन आहे. घरात लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन दिसतात.खासकरून मुले अधिक स्मार्टफोनचा वापर करत असल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की स्मार्टफोनच्या किती वापरामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचू शकते.

स्मार्टफोनचा वापर


एका सर्वेक्षणानुसार भारतात केवळ २४ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत. तर ४० टक्के लोक मोबाईल फोनचा वापर करतात. संचार तसेच ग्रामीण विकास राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी गेल्या वर्षी लोकसभे एका प्रश्नावर लिखित उत्तरात सांगितले की देशात ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६४४१३१ गावांमध्ये साधारण ६,२३, ६२२ गावांमध्ये मोबाईल कव्हरेज आहे. देशात मोबाईलचा वापर करणाऱ्यांची संख्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ११५.१२ कोटी झाली आहे.


किती वेळ मोबाईलचा वापर केला पाहिजे


आता प्रश्न हा आहे की मोबाईल फोनचा वापर किती वेळ केला पाहिजे. आजच्या काळात लोकांचा अधिकतर वेळ मोबाईलमध्ये जात असल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. तर तज्ञांनुसार मोबाईलचा वापर दिवसभरातून २ तासांपेक्षा अधिक करू नये. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. इतकंच नव्हे सातत्याने मोबाईल फोन पाहू नये. जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल तर डोळ्यांपासून कमीत कमी १८ इंच दूर ठेवला पाहिजे.


मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला आजारी पाडू शकतो. मोबाईलमधून रेडिएशन्स निघत असतात. दीर्घकाळ अशा गोष्टींच्या संपर्कात राहिल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. याशिवाय मोबाईल फोन जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का याबाबत संशोधन सुरू आहे.
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी