मुंबई : कांदिवलीच्या एका खासगी शाळेला एक ई-मेल आला. या मेलमध्ये शाळेच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनाने लगेच जवळच्या पोलीस ठाण्याला ई-मेलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक तसेच आधुनिक डिटेक्टरच्या मदतीने शाळेच्या इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत शाळेत कुठेही बॉम्ब आढळला नाही. यामुळे ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शाळेला आलेल्या ई-मेलमध्ये अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. पण तपासणीअंती शाळेच्या इमारतीत तसेच आवारात कुठेही बॉम्ब नसल्याचे लक्षात आले. अखेरीस ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पोलीस आता ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने शोध घेत आहेत. ई-मेल पाठवणाऱ्याच्या विरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी २३ जानेवारी जोगेश्वरीतील ओशिवरा भागातल्या एका शाळेला ई-मेल आला होता. या मेलमध्ये पण अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. मेलमधील दावा पुढे अफवाच ठरली. पण खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ओशिवरात तसेच कांदिवलीत शाळेत जाऊन सखोल तपासणी केल्यानंतरच बॉम्बेबाबतचा दावा ही अफवा असल्याचा निष्कर्ष काढला आहे. आता दोन्ही प्रकरणांमध्ये मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी एक आहे की वेगवेगळे आहेत हे तपास पूर्ण झाल्यावर लक्षात येईल; असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…