शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला आणि...

मुंबई : कांदिवलीच्या एका खासगी शाळेला एक ई-मेल आला. या मेलमध्ये शाळेच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनाने लगेच जवळच्या पोलीस ठाण्याला ई-मेलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक तसेच आधुनिक डिटेक्टरच्या मदतीने शाळेच्या इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत शाळेत कुठेही बॉम्ब आढळला नाही. यामुळे ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.



शाळेला आलेल्या ई-मेलमध्ये अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. पण तपासणीअंती शाळेच्या इमारतीत तसेच आवारात कुठेही बॉम्ब नसल्याचे लक्षात आले. अखेरीस ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पोलीस आता ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने शोध घेत आहेत. ई-मेल पाठवणाऱ्याच्या विरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी २३ जानेवारी जोगेश्वरीतील ओशिवरा भागातल्या एका शाळेला ई-मेल आला होता. या मेलमध्ये पण अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. मेलमधील दावा पुढे अफवाच ठरली. पण खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ओशिवरात तसेच कांदिवलीत शाळेत जाऊन सखोल तपासणी केल्यानंतरच बॉम्बेबाबतचा दावा ही अफवा असल्याचा निष्कर्ष काढला आहे. आता दोन्ही प्रकरणांमध्ये मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी एक आहे की वेगवेगळे आहेत हे तपास पूर्ण झाल्यावर लक्षात येईल; असे पोलिसांनी सांगितले.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही