शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला आणि...

मुंबई : कांदिवलीच्या एका खासगी शाळेला एक ई-मेल आला. या मेलमध्ये शाळेच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनाने लगेच जवळच्या पोलीस ठाण्याला ई-मेलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक तसेच आधुनिक डिटेक्टरच्या मदतीने शाळेच्या इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत शाळेत कुठेही बॉम्ब आढळला नाही. यामुळे ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.



शाळेला आलेल्या ई-मेलमध्ये अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. पण तपासणीअंती शाळेच्या इमारतीत तसेच आवारात कुठेही बॉम्ब नसल्याचे लक्षात आले. अखेरीस ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पोलीस आता ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने शोध घेत आहेत. ई-मेल पाठवणाऱ्याच्या विरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी २३ जानेवारी जोगेश्वरीतील ओशिवरा भागातल्या एका शाळेला ई-मेल आला होता. या मेलमध्ये पण अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. मेलमधील दावा पुढे अफवाच ठरली. पण खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ओशिवरात तसेच कांदिवलीत शाळेत जाऊन सखोल तपासणी केल्यानंतरच बॉम्बेबाबतचा दावा ही अफवा असल्याचा निष्कर्ष काढला आहे. आता दोन्ही प्रकरणांमध्ये मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी एक आहे की वेगवेगळे आहेत हे तपास पूर्ण झाल्यावर लक्षात येईल; असे पोलिसांनी सांगितले.
Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार