रोहित शर्माची मुंबई रणजी ट्रॉफीतून माघार

Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल १० वर्षांनंतर रणजी क्रिकेट खेळले. मुंबईच्या संघाकडून खेळताना तो दोनही डावात फारशी चमक दाखवू शकला नाही. याआधी भारतीय संघात आणि मग मुंबई रणजीमध्ये अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने अखेर नाईलाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

वृत्तानुसार, रोहितने इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीमुळे रणजी ट्रॉफीमध्ये यापुढे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने मुंबई संघ व्यवस्थापनालाही कळवले आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता यापुढे रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या पुढील फेरीत खेळणार नाही.दुसरीकडे, यशस्वी जैस्वालही मुंबईच्या पुढील रणजी सामन्यात दिसणार नाही. इंग्लंडची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो भारतीय संघाचा एक भाग आहे. त्यामुळे तोदेखील भारतीय संघासोबतच सराव करताना दिसेल.

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा वनडे क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहितने मुंबई रणजीतून आपले नाव मागे घेतले आहे. रोहित शर्माने जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी सामना खेळला. या सामन्यातून कसोटीतील हरवलेला फॉर्म परत मिळवण्याचे त्याचे ध्येय होते. मात्र दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला. त्याला या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ ३ धावा तर दुसऱ्या डावात २८ धावा करता आल्या. मुंबई संघाचा पुढील सामना मेघालयशी ३० जानेवारीपासून होणार आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

34 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

35 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

42 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

46 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

55 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

58 minutes ago