कर्नाक पुलाचा दुसरा गर्डर शनिवारी रात्री बसवणार; मे २०२५ पर्यंत बांधकाम होणार पूर्ण

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा गर्डर टाकण्याचे काम शनिवारी रात्री करण्यात येत आहे. रेल्वेच्यावतीने यासाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रात्री साडेबारापासून हे गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.


दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या पुलाच्या रेल्वे हद्दीतील पहिल्या गर्डरचे काम रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरा गर्डर टाकण्याचे अपेक्षित होते.



परंतु यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक जाहीर करणे अवाश्यक होते, परंतु हा ब्लॉक मिळत नसल्याने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात महापालिका आयुक्त कार्यालयात मध्य रेल्वेचे डीआरएम आले असता त्यांनी कर्नाक बंदर येथील पुलाच्या दुसऱ्या गर्डर करता ब्लॉक घेण्याची विनंती केली आणि त्यानुसार रेल्वेने ही मागणी मान्य करून शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा ब्लॉक जाहीर केला. त्यानुसार मध्य रेल्वेने शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा ब्लॉक जाहीर केल्याने या कर्नाक पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण केले जाणार आहे.


या दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर वरील बांधकाम आणि पोहोच मार्गाचे बांधकाम करून यापुलाचे सर्व बांधकाम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणे अपेक्षित असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात