कर्नाक पुलाचा दुसरा गर्डर शनिवारी रात्री बसवणार; मे २०२५ पर्यंत बांधकाम होणार पूर्ण

  47

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा गर्डर टाकण्याचे काम शनिवारी रात्री करण्यात येत आहे. रेल्वेच्यावतीने यासाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रात्री साडेबारापासून हे गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.


दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या पुलाच्या रेल्वे हद्दीतील पहिल्या गर्डरचे काम रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरा गर्डर टाकण्याचे अपेक्षित होते.



परंतु यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक जाहीर करणे अवाश्यक होते, परंतु हा ब्लॉक मिळत नसल्याने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात महापालिका आयुक्त कार्यालयात मध्य रेल्वेचे डीआरएम आले असता त्यांनी कर्नाक बंदर येथील पुलाच्या दुसऱ्या गर्डर करता ब्लॉक घेण्याची विनंती केली आणि त्यानुसार रेल्वेने ही मागणी मान्य करून शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा ब्लॉक जाहीर केला. त्यानुसार मध्य रेल्वेने शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा ब्लॉक जाहीर केल्याने या कर्नाक पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण केले जाणार आहे.


या दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर वरील बांधकाम आणि पोहोच मार्गाचे बांधकाम करून यापुलाचे सर्व बांधकाम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणे अपेक्षित असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.