RBI Action : 'या' मोठ्या बँकांना आरबीआयचा दणका! ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड

नवी दिल्ली : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची पाऊले उचलत असते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील तीन मोठ्या बँकांनी निर्देशांचे पालन न केल्याबाबत चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये सहकारी बँकांचाही समावेश आहे.



आरबीआयने जम्मू आणि काश्मीर बँक (J&K बँक), बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि कॅनरा बँकेला (Canara Bank) नियम न पाळल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर कॅनरा बँकेवर १.६३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) द्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील आचारसंहितेचे पालन न केल्याबद्दल डॅटसन एक्सपोर्ट्स पश्चिम बंगालला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


दरम्यान, प्राईव्हेट सेक्टरमधील जम्मू-काश्मीर बँकेला कर्जा संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी J&K बँकेवर ३.३१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.



ग्राहकांवर होणार परिणाम?


नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना दंड ठोठावला आहे. मात्र या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही. बँकेसोबतचे ग्राहकांचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. तसेच बँकेने ग्राहकांना दिलेल्या सेवांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर