RBI Action : 'या' मोठ्या बँकांना आरबीआयचा दणका! ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड

नवी दिल्ली : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची पाऊले उचलत असते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील तीन मोठ्या बँकांनी निर्देशांचे पालन न केल्याबाबत चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये सहकारी बँकांचाही समावेश आहे.



आरबीआयने जम्मू आणि काश्मीर बँक (J&K बँक), बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि कॅनरा बँकेला (Canara Bank) नियम न पाळल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर कॅनरा बँकेवर १.६३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) द्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील आचारसंहितेचे पालन न केल्याबद्दल डॅटसन एक्सपोर्ट्स पश्चिम बंगालला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


दरम्यान, प्राईव्हेट सेक्टरमधील जम्मू-काश्मीर बँकेला कर्जा संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी J&K बँकेवर ३.३१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.



ग्राहकांवर होणार परिणाम?


नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना दंड ठोठावला आहे. मात्र या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही. बँकेसोबतचे ग्राहकांचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. तसेच बँकेने ग्राहकांना दिलेल्या सेवांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Comments
Add Comment

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या

धक्कादायक! सौंदर्याच्या ईर्ष्येतून तरुणीने केली चार लहानग्यांची हत्या, विकृत मानसिकतेमुळे पोटच्या मुलीचाही केला नाही विचार

पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती