RBI Action : 'या' मोठ्या बँकांना आरबीआयचा दणका! ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड

नवी दिल्ली : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची पाऊले उचलत असते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील तीन मोठ्या बँकांनी निर्देशांचे पालन न केल्याबाबत चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये सहकारी बँकांचाही समावेश आहे.



आरबीआयने जम्मू आणि काश्मीर बँक (J&K बँक), बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि कॅनरा बँकेला (Canara Bank) नियम न पाळल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर कॅनरा बँकेवर १.६३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) द्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील आचारसंहितेचे पालन न केल्याबद्दल डॅटसन एक्सपोर्ट्स पश्चिम बंगालला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


दरम्यान, प्राईव्हेट सेक्टरमधील जम्मू-काश्मीर बँकेला कर्जा संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी J&K बँकेवर ३.३१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.



ग्राहकांवर होणार परिणाम?


नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना दंड ठोठावला आहे. मात्र या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही. बँकेसोबतचे ग्राहकांचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. तसेच बँकेने ग्राहकांना दिलेल्या सेवांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या