RBI Action : 'या' मोठ्या बँकांना आरबीआयचा दणका! ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड

नवी दिल्ली : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची पाऊले उचलत असते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील तीन मोठ्या बँकांनी निर्देशांचे पालन न केल्याबाबत चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये सहकारी बँकांचाही समावेश आहे.



आरबीआयने जम्मू आणि काश्मीर बँक (J&K बँक), बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि कॅनरा बँकेला (Canara Bank) नियम न पाळल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर कॅनरा बँकेवर १.६३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) द्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील आचारसंहितेचे पालन न केल्याबद्दल डॅटसन एक्सपोर्ट्स पश्चिम बंगालला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


दरम्यान, प्राईव्हेट सेक्टरमधील जम्मू-काश्मीर बँकेला कर्जा संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी J&K बँकेवर ३.३१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.



ग्राहकांवर होणार परिणाम?


नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना दंड ठोठावला आहे. मात्र या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही. बँकेसोबतचे ग्राहकांचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. तसेच बँकेने ग्राहकांना दिलेल्या सेवांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था