सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा न्याय दरबार

सिंधुदुर्ग : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणेंनी न्याय दरबाराचे आयोजन केले होते. जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांसाठी प्रजासत्ताक दिनी १३२ आंदोलनं होणार होती. पण पालकमंत्र्यांनी ही आंदोलनं करणार असलेल्या आंदोलकांशी चर्चा केली. प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन मंत्री महोदयांनी आंदोलकांना दिले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा नियोजन समिती सभागृहातील हा न्याय दरबाराचा अभिनव व आदर्श पायंडा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरू केल्याच्या प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या.



आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, शासकीय सेवातील निवृत्त झालेले कर्मचारी, महिला, नागरिक, सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे प्रश्न अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्भयपणे पालकमंत्री नितेश राणे यांच्यापुढे मांडले. यावेळी प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सक्षम अधिकाऱ्यांना जबाबदारी आणि प्रश्न सोडवण्यासाठी कालमर्यादा निश्चित करुन दिली. तसेच आंदोलकांना उपोषण करू नका, असे आवाहन केले. आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले.



महसूल विभागातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांची कामातील दिरंगाई, ग्रामसेवकांची मनमानी, खाजगी व सरकारी जागेतील अतिक्रमणे, धान्य वितरण व्यवस्थेतील त्रुटी, तिलारी व अन्य धरणग्रस्तांचे प्रश्न, वाळू उत्खनन व महसूल विभागाची कारवाईत होणारी दिरंगाई त्यातील भ्रष्टाचार, महिलांच्या स्वच्छतागृहाचे प्रश्न, जलजीवन कामातील दिरंगाई व निर्माण झालेल्या पाणी प्रश्न, पूर हानीत पडलेल्या घरांची नुकसान भरपाई, महामार्ग संपादन व त्यामधील नुकसान भरपाईचे प्रश्न, अपुऱ्या प्रवासी सुविधा, एसटी सेवेतील प्रश्न, अनुकंपा तत्वावरील रखडलेल्या नियुक्ती, माजी सैनिक असलेल्या नागरिकांचे घराच्या कर आकारणीबाबतचे प्रश्न, ग्रामसेवकांना बायोमेट्रिक प्रणाली बंधनकारक करण्याची मागणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातील अवास्तव कमिशन, बेकायदा वाळू उत्खनन रोखण्यासाठी लावण्यात येणाऱ्या रॅम्पच्या जमीन मालकांवर कारवाई, विद्युत विभाग व दूरसंचार विभागाबाबत तक्रारी, सिंधू नगरी नगरपंचायत व अश्वारूढ पुतळा कार्यवाही, निवृत्तीवेतनधारकांचे काही प्रश्न, फळ पीक विमा बाबतची नुकसान भरपाई याकडे नागरिकांनी लक्ष वेधले.

जनतेचा सेवक म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आंदोलकांशी संवाद साधताना सांगितले. प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवले जातील. जर काही प्रश्न कायद्याच्या चौकटीबाहेरचे असतील तर ते चर्चेतून आणि परस्पर सामंजस्य आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करुन सोडवले जातील, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दिरंगाई करू नये. आगामी काळात कोणावर उपोषण करण्याची वेळ येऊ नये यासाठी उपाय करा असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.
Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची