'गो तस्करी ही संघटीत गुन्हेगारी'

चिपळूण : कुंभार्ली घाटातील गुरे तस्करी प्रकरणातील आरोपींवर जामीनपात्र कलमे लागली आहेत. या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असली तरी गुरे वाहतूक संघटीत गुन्हेगारी असल्याने या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे तसेच या आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी, अशी आपली मागणी असून यासंदर्भात पोलिस प्रशासनाशी चर्चा केली आहे. येत्या अधिवेशनात गोवंश तस्करीप्रकरणी अजामीनपात्र कडक कायदा होण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे गर्जना सभेत दिली. हिंदू टिकला तरच देश टिकेल असे सांगतानाच आता जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभा चिपळूणमध्ये होत असली तरी आता पुढील सभा ही कराड येथे घेतली जाईल व गुरे तस्करी व गोमांस विक्रीचे पूर्ण रॅकेटच उद‌्ध्वस्त करून टाकू, असा इशारा आ. राणे यांनी यावेळी दिला. आपण संघटीतपणे आणि आक्रमकपणे याला विरोध करून गोमातेचे रक्षण केले पाहिजे, असे आ. राणे यावेळी म्हणाले. परत गुरे वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला तर गुरे गाडीतून उतरवायची आणि ते वाहन पेटवून द्यायला मागे पुढे बघू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आ. राणे यांनी यावेळी गोरक्षकांना दिली. एका विशिष्ट वर्गातीलच लोक या व्यवसायात वारंवार आरोपी म्हणून हाती लागत आहेत. या विशिष्ट वर्गाकडून कायमच देशविघातक कृत्य केली जात आहेत. गोहत्या, लवजिहाद, लॅण्डजिहाद यांसारखे प्रकार घडत आहेत. तर भारताविरोधी कारवाई करण्यासाठी परदेशातून काही शक्ती अशा जिहादी लोकांना मदत करत आहेत. त्यामुळे यापुढे आक्रमकपणे याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. ज्या देशात यांनी आपली संख्या वाढवली, तो देश संकटात गेला. त्यामुळे भारतात हिंदु टिकला पाहिजे, कारण हिंदु टिकला तरच देश टिकेल आणि यासाठी आपण संघटीतपणे अशा कृत्यांना प्रतिबंध करून आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे, असे आ. राणे म्हणाले.



यावेळी 'जय भवानी जय शिवाजी', 'गोहत्या को बंद करेंगे, ये हमारा संकल्प है!' 'गो माता की जय', 'जय श्रीराम' अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडण्यात आले होते. कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे गुरे तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या विषयात कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ. निलेश राणे यांनी तात्काळ लक्ष घालत चिपळूणमध्ये गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभेची घोषणा केली होती. जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक पतपेढीच्या हॉलमध्ये आ. राणेंच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी २५ जानेवारी रोजी सभा झाली. सभेच्या सुरुवातीला आमदार निलेश राणे यांनी गो-मातेचे पूजन केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली. कुंभार्ली घाटात गुरांची बेकायदा वाहतूक उघडकीस आणणारे भाजप पदाधिकारी विनोद भुरण, निहार कोवळे, मंदार भुरण यांचा आ. निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



याप्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे अनिरूद्ध भावे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मार्गदर्शन करताना गोमातेच्या रक्षणार्थ कडक कायदे व्हायला हवे, अशी मागणी केली. या सभेचे सुत्रसंचालन मंदार कदम यांनी केले. या सभेला मोठ्या प्रमाणावर विविध हिंदु संघटना, हिंदु बांधव आणि गोरक्षकांनी गर्दी केली होती.
Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार