Kumbha Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाडी उपलब्ध करून द्या- नवनीत राणा

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी


अमरावती : उत्तरप्रदेशात प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू असून या कुंभमेळाव्यासाठी अमरावतीहून प्रयागराजसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी खासदास नवनीत राणा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळावा सुरू झाले आहे. हा मेळावा २६ फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी देशविदेशातून नागरिक येत आहेत. अमरावती आणि लगतच्या जिल्ह्यातील लाखो नागरिक प्रयागराज येथे जाण्यास इच्छूक आहेत. परंतु त्यांना प्रयागराजला जाण्यासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा नाही.



परिणामी नागरिक महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यापासून वंचित राहत आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता, त्यांना कुंभमेळाव्यात सहभागी होता यावे, यासाठी अमरावती रेल्वे स्थानकाहून प्रयागराजपर्यंत दररोज कुंभमेळावा विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना ही गाडी सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश देण्यात यावेत, असे नवनीत राणा यांनी या पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला