Kumbha Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाडी उपलब्ध करून द्या- नवनीत राणा

  56

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी


अमरावती : उत्तरप्रदेशात प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू असून या कुंभमेळाव्यासाठी अमरावतीहून प्रयागराजसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी खासदास नवनीत राणा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळावा सुरू झाले आहे. हा मेळावा २६ फेब्रुवारीपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी देशविदेशातून नागरिक येत आहेत. अमरावती आणि लगतच्या जिल्ह्यातील लाखो नागरिक प्रयागराज येथे जाण्यास इच्छूक आहेत. परंतु त्यांना प्रयागराजला जाण्यासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा नाही.



परिणामी नागरिक महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यापासून वंचित राहत आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता, त्यांना कुंभमेळाव्यात सहभागी होता यावे, यासाठी अमरावती रेल्वे स्थानकाहून प्रयागराजपर्यंत दररोज कुंभमेळावा विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना ही गाडी सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश देण्यात यावेत, असे नवनीत राणा यांनी या पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.