IND vs ENG: भारताविरूद्धच्या पराभवानंतर इंग्लंडने दुसऱ्या टी-२०साठी बदलली प्लेईंग ११

मुंबई: इंग्लंडला भारताविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. भाराने त्यांना कोलकातामध्ये ७ विकेटनी हरवले होते. आता मालिकेतील दुसरा सामना चेन्नईत शनिवारी खेळवला जाईल. इंग्लंडने या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. इंग्लंडने गस एटकिन्सनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या जागी एक ऑलराऊंडर खेळाडूला प्लेईंग ११मध्ये संधी देण्यात आली आहे.


इंग्लंडला पहिल्या टी-२०मध्ये अतिशय लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले होते. संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १३२ धावाच केल्या होत्या. यानंतर भारताने हे आव्हान १२.५ षटकांत पूर्ण करत सामना जिंकला होता. इंग्लंडचा गस एटकिन्सन या सामन्यात महागडा ठरला होता. त्याने २ षटकांत ३८ धावा दिल्या होत्या.



इंग्लंडने ऑलराऊंडर खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिले स्थान


इंग्लंडने एटकिन्सनच्या जागी ब्रायडन कार्सला संधी दिली आहे. त्याचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहिला आहे. कार्सने इंग्लंडसाठी ४ टी-२० सामने खेळलेत. यादरम्यान ६ विकेट मिळवलेत. मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याने १९ वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. यात २३विकेट मिळवलेत.

Comments
Add Comment

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२०

श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण

विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या