अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना भारतात परत आणणार

परराष्ट्र प्रवक्ते जयस्वाल यांनी स्पष्ट केली भूमिका


नवी दिल्ली : अमेरिकेतील बेकायेशीर स्थलांतरितांच्या समर्थनात भारत उभा राहणार नाही. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज, शुक्रवारी सांगितले.


यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, अमेरिका आणि इतरत्र निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सरकार परत आणण्यासाठी पावले उचलेल. त्यासाठी सर्व नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. भारत बेकायदेशीर स्थलांतराच्या विरोधात आहे कारण ते संघटित गुन्हेगारीशी जोडलेले आहे.


भारत-अमेरिका संबंध खूप मजबूत आणि बहुआयामी आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही खूप चांगले आहेत. दोन्ही देशांनी व्यापाराशी संबंधित कोणत्याही बाबींवर चर्चा करण्यासाठी यंत्रणा स्थापित केल्या आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील चर्चेनुसार सुमारे १८ हजार भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवले जाऊ शकते. दरम्यान परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री २६-२७ जानेवारी रोजी चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव चीनमध्ये द्विपक्षीय हिताच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील असे जयस्वाल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण