Palghar Update : इअरफोनचे वेड विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर!

पालघर : कॉलेज तसेच शाळकरी तरुण तरुणींमध्ये इअरफोनच्या माध्यमातून गाणी ऐकणे किंवा कॉलवर समोरच्याशी तासनतास बोलणे हे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले असून हे वेड आता त्यांच्या जीवावरही बेतू लागले आहे. पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळील रेल्वे फाटकातून कानात इअरफोन घालून फाटक क्रॉस करणाऱ्या इयत्ता नववीमधील एका विद्यार्थिनीला एक्सप्रेस गाडीची धडक बसून आपले प्राण गमवावे लागल्याचा दुर्दैवी प्रकार गुरूवारी दुपारी घडला. वैष्णवी रावल राहणार माकणे, सफाळे (पश्चिम) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.



वैष्णवी ही सफाळे येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती. गुरुवारी दुपारी साधारण एक ते दीडच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे माकणे येथून सफाळे येथील ट्यूशनमध्ये जाण्यास निघाली. कानात इअरफोन घालून ती सफाळे स्थानकाजवळील बंद रेल्वे फाटक क्रॉस करत असताना फाटकातील महिला कर्मचारी तसेच अन्य नागरिकांनी आरडाओरड करुन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, इअरफोनमध्ये मग्न असणाऱ्या वैष्णवीला मुंबई दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस गाडीची धडक बसली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर पोस्टमार्टम करण्यात आले. वैष्णवी ही एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी