Ladki Bahin Yojana : कामाठीपुरात बांगलादेशी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ!

मुंबई : देशभरात सध्या बेकायदेशीरित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई सुरु आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे अनेक बांगलादेशी राहत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. अशातच मुंबईच्या कामाठीपुरा भागातून गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) बांगलादेशी महिलेने लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांचा अटक करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.


मुंबईत एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील कामाठीपुरा भागात राहणाऱ्या या बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि तिला सरकारकडून लाभही मिळाला होता. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.



क्राइम इंटेलिजेंस युनिटने कामाठीपुरा भागात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल आणि त्यांना आश्रय दिल्याबद्दल महादेव यादव या ३४ वर्षीय भारतीयालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या एका महिलेचे नाव उर्मिला खातून असे असून तिने लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयांचे दोन हप्ते मिळवले असल्याचे समोर आले आहे. या बांगलादेशी महिलेचे आधारकार्ड बनावट असल्याचा दावा केला आहे.

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने